Friday, May 17, 2024

मोदीच्या राज्यात जीवांची गॅरंटी शुन्य

 मुंबई, दि. 15 (प्रतिनिधी) – मोदी की गॅरंटी, म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या राज्यात लोकांच्या जीवांची कोणतीही गॅरंटी राहिली नाही. मोदी की झिरो गॅरंटी, अशी म्हणण्याची वेळ आता देशातील नागरिकांवर आली आहे, अशी घणाघाती टीका ईशान्य मुंबईतील मतदारांनी केली आहे.

 केवळ मतांसाठी मुंबईत आलेल्या नरेंद्र मोदी यांना मुंबईकरांची काळजी नसल्याचे दिसून आले आहे. घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू तर 70 हुन अधिक नागरिक जखमी झाले असतानाही नरेंद्र मोदी यांना जखमींना हॉस्पिटल मध्ये जाऊन भेटण्यास वेळ मिळाला नाही. सतत राजकारण करणा-या मोदींनी केवळ रोड शो करीत मतांचा जोगवा मागण्यात धन्यता मानली, असा आरोप ईशान्य मुंबईतील मतदारांनी केला.

 ईशान्य मुंबईतून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी भाजपा समोर कडवे आव्हान उभे केल्याने ईशान्य मुंबईची जागा गमवावी लागण्याचे चिन्ह आता भाजपाला दिसू लागले आहेत. त्यामुळे घाबरलेल्या भाजपाने थेट काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच प्रचारासाठी रस्त्यावर आणले. माझा देश माझा परिवार असा नारा देणा-या पंतप्रधानांना अपघातग्रस्तांचा परिवार हा आपला वाटला नाही. मोदी की गॅरेन्टी देणारा भाजप आज लोकांच्या जीवाची गॅरेन्टी देत नाही. असा आरोप ईशान्य मुंबईतील नागरिकांनी केला आहे

 काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो मुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तवर गांधीनगर, घाटकोपर भागाला जोडणारे सर्व रस्ते बंद केले होते. सर्व वाहतूक वेगवेगळ्या मार्गाने फिरविल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. यावर मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

संजय भाऊंना मिळणार राजा ढाले व आठवले गटाची मतं

 



मुंबई, दि. 15 (प्रतिनिधी) – स्वर्गिय राजा ढाले प्रतिष्ठानच्या सर्वेसर्वा अँड. गाथा ढाले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अनिल ओव्हाळ यांनी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

 गाथा ढाले आणि अनिल ओव्हाळ यांनी भाडुंप येथे संजय दिना पाटील  यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहिर केला. यावेळी संजय दिना पाटील यांची कन्या राजोल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. स्वर्गिय राजा ढाले यांना मानणारा एक मोठा वर्ग घाटकोपर, चेंबुर, गोवंडी, विक्रोळी, भांडुप व मुलुंड भागात आहे. दरम्यान राजा ढाले यांनी रामदास आठवले यांना घडविले आहे. त्यामुळे आठवले गट हा राजा ढाले प्रतिष्ठानशी विविध कार्याच्या माध्यमातून कायम जोडला गेला आहे. मुंबई मराठी माणसांची राहिली पाहिजे आणि संविधान वाचविण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना पाठिंबा देत आहोत असे गाथा ढाले यांनी सांगितले.

 भाजपच्या गुजरात धार्जिण्या राजकारणामुळे मराठी माणुस मुंबईच्या बाहेर फेकला जात आहे. मराठी माणसांची कामे ईशान्य मुंबईत गेल्या दहा वर्षात झालेली नाही. याअगोदर भाजपच्या दोन्हीही गुजराती खासदारांनी मराठी माणसांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मराठी माणुस भाजपच्या गुजराती धार्जिण्या राजकारणामुळे अस्वस्थ आहे. त्यात ईशान्य मुंबईतील मागासवर्गीय वस्त्यांकडे भाजपच्या गुजराती खासदारांनी नेहमीच पाठ फिरवली. त्यांनी कोणतीही विकासाची कामे मागासवर्गीय भागात केलेली नाही. यामुळे मागासवर्गीय भागात भाजपच्या उमेदवाराविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. असा आरोप गाथा ढाले आणि अनिल ओव्हाळ यांनी यावेळी केला.


मोदींचा रोड शो ठरला फ्लॉप शो

मोदींचा रोड शो ठरला फ्लॉप शो
रेल्वे, मेट्रो सेवा बंद केल्याने मुंबईकरांनी वाहिल्या लाखोल्या
कोणतीही पुर्व सुचना न देता रेल्वे व मेट्रो सेवा बंद
प्रवाशांनी रेल्वे ट्रॅक मधून चालत घर गाठले







मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) – घाटकोपर येथे मोदींच्या रोड शो मुळे मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांच्या रोड शो मुळे मेट्रो आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. याबाबतची कोणतीही पुर्व सुचना प्रवाशांना न दिल्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुडुंब गर्दी दिसून येत होती. त्यामुळे मतांचा जोगवा मागण्यासाठी मुंबईत आलेल्या पंतप्रधान मोदींना मुंबईकरांनी लाखोल्या वाहिल्या.

लोकसभेच्या मुंबईतील सहाही जागांवर संक्रांत आली असून भाजपच्या उमेदवारांनी नाराज असलेल्या मुंबईकरांची मतं मिळविण्यासाठी पंतप्रधान मोदींनाच रस्त्यावर आणले. घाटकोपर मध्ये त्यांचा रोड शो करण्यासाठी पोलिसांनी अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करुन इतरत्र वळविले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. त्यातच कोणतीही पुर्व सुचना न देता सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मेट्रो व रेल्वे सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे कामावरुन घरी जाणा-या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. लाखो प्रवाशी दोन तासांहुनही अधिक काळ रेल्वे स्थानकावर अडकुन पडले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने घामाघुम झालेल्या मुंबईकरांनी भाजपच्या नावाने लाखोल्या वाहण्यास सुरवात केली. लहान मुले, गरोदर महिला, आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना मोदींच्या रोड शोने प्रचंड मनस्थाप सहन करावा लागला. नाईलाजाने प्रवाशांना रेल्वे ट्रक मधून चालत आपल्या नियोजित स्थळी जावे लागत होते. रेल्वे विभागाकडून रेल्वे सेवा बंद करण्याच्या सुचनाही प्रवाशांना दिल्या जात नव्हत्या. त्यामुळे नेमके काय झाले याबाबत मुंबईकर प्रवाशी संभ्रमात पडले होते. तर दुसरीकडे भाजपच्या उमेदवारांसाठी मतांचा जोगवा मागण्यासाठी रोड शो करणा-या भाजपच्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्णय संतप्त प्रवाशांनी घेतला. त्याबाबत अनेक प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला.

दरम्यान मोदींनी मुंबईत रोड शो केल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येईल अशी सर्वाची अपेक्षा होती. मात्र परिस्थिती उलटी झाली. भाजपला मिळणारे मतं ही आता कमी होणार असून त्यांच्या मुंबईतील सर्व जागा अडचणीत आल्या असल्याचे जाणकारांचे मत आहे. तर दुसरीकडे घाटकोपर दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढत असताना मोदींनी रुग्णालयात जाऊन त्यांची चौकशीही केली नाही. किंवा मृतांच्या नातेवाईकांना भेटण्याची तसदीही घेतली नाही. केवळ मतांसाठी मुंबईत आलेल्या मोदींना या रोड शोचा काहीच फायदा होणार नसल्याचे लोकांनी सांगितले.




Thursday, May 16, 2024

भाजपच्या जुलमी सरकारला खाली आणायचे आहे – आदित्य ठाकरे

 भाजपच्या जुलमी सरकारला खाली आणायचे आहे – आदित्य ठाकरे
धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा जीआर रद्द करणार – आदित्य ठाकरे
चार जुनला इंडिया आघाडीचे सरकार येणार – आदित्य ठाकरे





मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) – राज्यात भाजपचे सरकार असताना मोदीं कधी फारसे महाराष्ट्रात आले नाही. राज्यात रोजगार मिळावा म्हणुन काहीच प्रयत्न केले नाही. उलट राज्यातील उद्योगधंदे गुजरात मध्ये नेऊन महाराष्ट्रातील जनतेवर अन्यायच केला. राज्यातील स्थिती काळजी करण्यासारखी असून राज्यात अत्याचाराच्या घटना वाढत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने हे कुठेतरी थांबले पाहिजे त्यासाठी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना भरघोष मतांनी निवडून दिल्लीला पाठवायचे आहे. असे उद्गार शिवसेनेचे आमदार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढले. मुलुंड येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते.

महाराष्ट्र तसेच मुंबईतील जनतेला आता भाजपचे सरकार नको आहे. ह्र्दयात राम आणि हाताला काम ही आपली हिंदुत्वाची व्याख्या आहे. महागाईने त्रस्त झालेल्या जनतेवर भीक मागण्याची वेळ या सरकारने आणली आहे. धारावीकरांच्या पुनर्वसनावर आदित्य ठाकरे म्हणाले आपले सरकार आल्यावर हा जीआर आम्ही रद्द करु आणि धारावीकरांना त्याच ठिकाणी घरे देऊ. भाजपचे उमेदवार मिहिर खोटेचा यांनी स्ट्रीट फर्निचर  घोटाळ्या प्रकरणी विधानसभेत खोटे बोलले. धारावी प्रकरणात लोकांची ते दिशाभुल करीत आहेत. त्यामुळे भाजपच्या जुलमी सरकारला खाली आणण्यासाठी संजय दिना पाटील यांना भरघोष मतांनी विजयी करुन दिल्लीला पाठवायचे आहे. जेणेकरुन मशालीचा आवाज दिल्लीला पोहचेल. चार जुनला इंडिया आघाडीचे सरकार येणार म्हणजे येणारच असा माझा ठाम विश्वास असल्याचे ही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

सध्या आपल्या देशाची काळजी वाटावी अशी परिस्थिती असून अत्याचाराच्या अनेक घटना देशात घडल्या आहेत. महाराष्ट्रात स्वतःचे सरकार असतानाही मोदी कधी फारसे महाराष्ट्रात आले नाहीत. आता एका पाठोपाठ एक अशा अनेक सभा ते घेत आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी 'मशाल' या चिन्हासमोरील बटण दाबून संजय दिना पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन गटनेते विधिमंडळ कांग्रेस, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्ली सोडून मुंबईतील गल्लीत यावे लागले. याचे कारण मागील १० वर्षात भाजपचे खासदार पूर्णपणे अपयशी ठरले आहे‌त. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी उद्याची 'मशाल' आजच पेटवणे गरजेचे आहे. त्यासाठीच येथील जनतेने संजय दिना पाटील यांना विजयी करून दिल्लीला पाठवण्यचा निर्धार केल्याचे मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी सांगितले.



Monday, May 13, 2024

मुंबई में धूल भरी आंधी से अफरा तफरी, पेट्रोल पंप पर भारी होर्डिंग गिरी


मुंबई के घाटकोपर में रमाबाई नगर घाटकोपर ईस्ट भारत पैट्रोल पम्प, इस्टर्न एक्सप्रेस हाइवे पर शाम साडे चार बजे तेज धूल भरी आंधी के बीच एक बहोत बड़ा लोखंड की पट्टी से बना होर्डिंग भारत पैट्रोल पम्प पर गिरने से चालीस लोग घायल हुए है जिनको नजदीकी मनपा अस्पताल में भारती करके उपचार शुरू किया गया है। रिपोर्ट में कहा गया है कि और कुछ लोगों के फंसे होने की आशंका है। होर्डिंग एक पेट्रोल पम्प की दीवार पर ही था। दृश्यों से पता चलता है कि पेट्रोल पम्प के ठीक बीच में ढांचा ढह गया। मुंबई पुलिस ने कहा कि बचावकर्मी घटनास्थल पर हैं और मलबे में फंसे जीवित बचे लोगों की तलाश कर रहे हैं। अभी तक किसीकी हताहत की खबर नहीं है। सूत्रों से पता चला है की ये होर्डिंग अनाधिकृत था और मुंबई में जितने भी अनाधिकृत होर्डिंग लगे है उसपर कठोर दंडनीय कार्यवाही होनी चाहिए और इनके उपर कार्यवाही नहीं करने वाले अधिकारिओ के उपर भी सजापात्र दंडनीय कार्यवाही होनी चाहिए।


जनसंवाद प्रचार फेरी, मुलुंड. उत्तर पूर्व मुंबई l ईशान्य मुंबई मुंबई जिल्ह्याचे महाविकास l इंडिया आघाडी

#LokSabhaElection2024

जनसंवाद प्रचार फेरी, मुलुंड. उत्तर पूर्व मुंबई l ईशान्य मुंबई मुंबई जिल्ह्याचे महाविकास l इंडिया आघाडीचे उमेदवार शिवसेना UBT चे संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचार रथासह मुलुंड विधानसभेत काँग्रेसची जनसंवाद प्रचारफेरी. Indian National Congress - Mumbai l Varsha Gaikwad l Sanjay Dina Patil l Sanjay Dina Patil l #NorthEastMumbai l #MahaVikasAghadi l #Mulund l #Mumbai l ShivSena l #MumbaiNorthEast l #लोकसभाचुनाव2024 l #LokSabhaElections

Saturday, May 11, 2024

भाजपकडून केली जाते मुलुंडकरांची फसवणुक मुलुंडमध्येच होणार धारावीकरांचे पुनर्वसन मिहिर कोटेचा व किरीट सोमय्या करतात मतदारांची दिशाभूल


मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) – मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य करणा-या बांग्लादेशी नागरिकांना ईशान्य मुंबईत होणा-या पीएपी प्रकल्पातच पुनर्वसन करण्याचा घाट महायुतीच्या सरकारने घातला आहे. असे असतानाही किरीट सोमय्या व लोकसभेचे भाजप उमेदवार मिहिर कोटेचा हे ईशान्य मुंबईतील मतदारांची फसवणुक करत आहे. असा आरोप अँड. सागर देवरे यांनी केला आहे.

 

अलिकडेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक बांग्लादेशींची यादी दाखवत पीएपी प्रकल्पामध्ये एकाही बांग्लादेशी नागरिकाला येऊ देणार नाही अशी भुमिका जाहीर केली होती. मात्र किरीट सोमय्या व भाजप उमेदवार मिहिर कोटेचा हे खोटी माहिती देऊन ईशान्य मुंबईतील मतदारांची दिशाभुल करीत आहेत. असे सांगत मुळात भारतात बांग्लादेशी नागरिक आलेच कसे या बांग्लादेशी नागरिकांचे ईशान्य मुंबईतील पीएपी प्रकल्पात पुनर्वसन कोणत्या कायद्याच्या आधारे करणार आहे. हे महायुतीच्या सरकारने सांगावे, असा सवाल अँड.सागर देवरे यांनी उपस्थित केला आहे.

 

मनपा आयुक्तांना पीएपी प्रकल्प मंजुर करण्याचे अधिकार नगर विकास खात्याने 11 जानेवारी 2022 रोजी एक अधिसुचनेव्दारे काढली. त्यात नागरिकांच्या हरकती व सुचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर जुन 2022 मध्ये सरकार बदलले व मुलुंड मधील पीएपी प्रकल्पाला जुन 2023 मध्ये पहिल्या पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली. त्यानंतर 2022 फेब्रुवारी व 2024 ला पीएपी प्रकल्पाला महायुती सरकारने अंतिम मंजुरी दिली. मग यावेळी किरीट सोमय्या व मिहिर कोटेचा यांनी अंतिम अधिसुचनेला विरोध का केला नाही असा सवालही अँड. सागर देवरे यांनी केला आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर मतदारांची दिशाभुल करण्यासाठी मिहिर कोटेचा व किरीट सोमय्या पीएपी प्रकल्पाला विरोध असल्याचे नाटक करीत आहेत. अशी घणाघात टीका अँड. सागर देवरे यांनी केली आहे.

 

तसेच धारावी पुनर्वसनच्या बाबतही मिहिर कोटेचा व किरीट सोमय्या  हे ईशान्य मुंबईतील मतदारांची फसवणुक निवडणुकीच्या तोंडावर करीत आहे. अलिकडेच धारावी पुनर्वसनासाठी मुंबई महापालिकेची डम्पिंग ग्राऊडची 41.6 एकर जागा सरकारला देण्यात आलेली नाही. अशी खोटी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तथापी मुलुंड मधील जकात नाका याची 18 एकर व त्या बाजुची 46 एकर जागा मनपाच्या मालकीची असून राज्य सरकारने धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी 10 जानेवारी 2024 रोजी मुंबई मनपाकडे पत्राव्दारे मागितली आहे. त्यापैकी जकात नाक्याची 18 एकर जागा राज्य सरकारला देण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्याबाबत मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेले आहे. मात्र हि बाब किरीट सोमय्या यांनी मतदारांपासून लपवुन ठेवली असा आरोप अँड. देवरे यांनी केला आहे. तसेच क्रेंद्र सरकारकडे राज्य शासनाने मिठागरांची जागा देण्याची मागणी केली आहे. असे असतांनाही किरीट सोमय्या यांनी मिठागरांच्या जागेवर होणा-या धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत काहीही बोलत नाही.

 

या वर्षी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धारावी पुनर्वसनासाठी मुलुंड मधील एकही स्केवर फिट जागा दिलेली नाही असे बेजबाबदार वक्तव्य करणारे भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा हे आता कोणत्या तोंडाने धारावी पुनर्वसन पीएपी प्रकल्पाला विरोध करीत आहे. असा सवालही अँड. सागर देवरे यांनी उपस्थित केला. ईशान्य मुंबईतील मतदारांची फसवणुक करणारे भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांना मुलुंड मधील मतदार जागा दाखवुन देतील. असा विश्वास अँड. सागर देवरे यांनी व्यक्त केला.

Friday, May 10, 2024

As Mihir Kotecha is now a 'fake', Kirit Somaiya had to be brought forward, but Mulundkar believes that it is also a throwaway.

 As Mihir Kotecha is now a 'fake', Kirit Somaiya had to be brought forward, but Mulundkar believes that it is also a throwaway.


मिहिर कोटेचा आता ‘खोटे’चा ठरल्याने किरीट सोमय्यांना पुढे आणावे लागले मात्र तेही फेकय्या असल्याचे मुलुंडकरांचे मत

 

मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) – मुलुंड मध्ये धारावीकरांचे पुर्नवसन करण्यात येऊ नये म्हणुन गेले वर्षभर आंदोलन करण्यात येत आहे. त्यावेळी एकही भाजप नेत्याने या आंदोलनात सहभाग घेतला नव्हता. किरीट सोमय्या या विषयावर बोलायला तयार नव्हते. आता अचानक त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर आपली बाजु मांडली. केवळ मराठी मतांसाठी किरीट सोमय्या यांनी या प्रकल्पाला विऱोध केला असल्याचे मुलुंडकरांचे म्हणणे आहे.

 

धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड मध्ये करण्यात येऊ नये म्हणुन गेले वर्षभर मुलुंड मध्ये वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. साखळी आंदोलन, साखळी उपोषण करुन मुलुंडकरांनी धारावीकरांच्या पुनर्वसनाला विरोध केला होता. मात्र या दरम्यान एकही भाजप नेत्याने या प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे सांगितले नव्हते. आता मात्र निवडणुक लागल्यानंतर आचारसंहिता चालू असताना केवळ दिखावा म्हणुन आमदार मिहिर कोटेचा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून धारावी प्रकल्पाला विरोध केला. हि बाब लोक्याच्या लक्षात आल्यावर लोकांनी कोटेचा यांच्यावर विश्वास ठेवायचे सोडून दिले. कोटेचा कार्ड चालत नाही म्हणुन त्यांनी किरीट सोमय्यांना पुढे आणले. कारण गेले वर्षभर सोमय्या यांनी इतरांना जेल मध्ये टाकण्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या. त्यावेळी त्यांनी एकदाही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला आपला विरोध असल्याचा उल्लेख केला नाही. आता मात्र त्यांना अचानक मुलुंडकरांची आठवण झाली. त्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला विरोध असल्याचे जाहिर केले. मुळात भाजप मध्ये किरीट सोमय्या यांचे काहीच वजन राहिले नसून आता त्यांना कोणीच विचारत नाही. किमान राज्यसभा मिळेल अशी अपेक्षा सोमय्या होती. मात्र त्यांना तेही देण्यात आले नाही. त्यानंतर त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी बराच प्रयत्न केला. पण एका खाजगी वाहिणीने त्यांचे व्हिडीओ दाखवुन सोमय्या यांची बदनामी केली. त्यामुळे सोमय्या यांना लोकसभेचे तिकीट ही देण्यात आले नाही. आता चर्चेत राहायचे म्हणुन त्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन धारावी प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले. अशी माहिती अँड. सागर देवरे यांनी पत्रकारांना दिली. किरोट सोमय्या हे कोटेच्या सारखेच फेकय्या असल्याचे मुलुंडकरांनी सांगितले. आता यांनी काहीही केले तरी यांना मतदान करणार नसल्याचे मुलुंडकरांनी पत्रकारांना सांगितले.



Kotecha again proved to be a 'lie', Mulundkar's decision not to vote for Kotecha

 कोटेचा पुन्हा ‘खोटे’चा ठरले, कोटेच्यांना मत देणार नसल्याचा मुलुंडकरांचा निर्णय
 

मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) – मुलुंड परिसरात टर्मिनस व क्रीडा संकुल उभारण्याचे आश्वासन देणारे महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी पुन्हा एकदा मुलुंडकरांच्या तोंडाला पाने पुसली आहे. गेल्या पाच वर्षात आश्वासना शिवाय काहीच काम न करणा-या कोटेचा यांनी एकाच ठिकाणी दोन वेळा भुमीपुजन करुनही पाच वर्षात क्रीडा संकुल बांधले नाही. कोटेचा हे निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन देण्याच काम करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

 

दिवंगत आमदार सरदार तारासिंग यांनी मुलुंड मध्ये क्रीडा संकुल व्हावे म्हणुन पाच वर्षापुर्वी भुमिपुजन केले होते. त्यानंतर आमदार मिहिर कोटेचा यांनी त्याच जागेवर दुस-यांदा भुमिपुजन केले. मात्र पाच वर्षात त्यांनी काहीच काम केले नाही. गेल्या पाच वर्षांत कोटेचा यांनी विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासन देण्याचे काम केले. मुलुंड मध्ये वाहतुकीची मोठी समस्या असून त्यावर कोटेचा यांनी काहीच उपाययोजना केली नाही. हरिओमनगर मधील रहिवाश्यांना आजही टोल भरावा लागतो. त्याबाबत अनेकदा आंदोलन करुनही कोटेचा यांनी दुर्लक्ष केले. हरिओम नगर मधील रहिवाश्यांनी कोटेचा यांच्याशी अनेकदा पत्रव्यावहारही केला. मात्र कोटेचा यांनी आश्वासना शिवाय काहीच केले नाही. निवडणुका जवळ आल्यावर कोटेचा यांनी टोलचा प्रश्न लवकरच निकाली काढू येत्या पाच वर्षात क्रीडा संकुल व टर्मिनसचे काम सुरु करु असे आश्वासन निवडणुकीच्या तोंडावर मुलुंडकरांना दिले. मात्र गेल्या दहा वर्षात भाजपने काहीच काम केले नाही ते आता काय करतील असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.

तरुण मतदारांची भाजपकडे पाठ, मराठी गुजराती वाद निर्माण करणा-यांना मतदान नाही

Young voters turn their backs on BJP, Marathi Gujaratis don't vote for controversies


मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) – मराठी गुजराती असा वाद निर्माण करणा-या मिहिर कोटेचांना मतदान करणार नसल्याचा निर्णय ईशान्य मुंबईतील मराठी तरुणांनी घेतला आहे. केवळ मतांसाठी लोकांकडे जाणा-या कोटेचांना आता मतदारांनीच पाठ फिरवायला सुरवात केली आहे.


राज्यातील अनेक उद्योग गुजरात मध्ये नेणा-या भाजप सरकारने बेरोजगार मराठी तरुणांचा साधा विचारही केला नाही. महागाई
, बेरोजगारी वाढविण्याशिवाय भाजपने गेल्या दहा वर्षात काहीच काम केले नाही. आता निवडणुक आल्यावर भाजपला मराठी मतदारांची आठवण झाली. याच मराठी लोकांना गुजराती वस्ती असलेल्या ठिकाणी घर, दुकान नाकारण्यात आले. मुंबई सारख्या ठिकाणी शिवसैनिकांना इमारती मध्ये प्रवेश दिला नाही. अशा वेळी मतदान मागायला येणा-या मिहिर कोटेचा यांनी गेल्या पाच वर्षात काय केले असा प्रश्न विचारल्यावर कोटेचा संताप व्यक्त करतात. हा अनुभव अनेक तरुण मतदारांनी सांगितला. मराठी माणसांचा व्देष करणा-या भाजपला मतदान करणार नसल्याचा निर्णय ईशान्य मुंबईतील तरुण मतदारांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले.

 

Demand to suspend verified, official social media accounts of Mihir Korecha and BJP4Mumbai

महत्त्वाची बातमी





भाजपच्या सोशल मीडिया अकाउंट्स विरोधात संजय पाटील यांची निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार





उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा आणि मुंबई भाजपचे अधिकृत सोशल मीडिया अकाउंट BJP4Mumbai यांच्यावर हिंदू विरुद्ध मुस्लिम, तसंच मराठी विरुद्ध गुजराती अशी तेढ निर्माण करणे, सामाजिक सलोखा नष्ट करणे व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याबद्दल भा.दं.सं. १८६० व माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (IT Act) नुसार कारवाई करून गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे – महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी निवडणूक आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मिहिर कोटेचा यांच्या व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंटवरही निवडणूक आयोगाच्या विविध मार्गदर्शक कायद्यांचा अवलंब करून कठोरात कठोर कारवाई करावी तसंच त्वरित संबंधित सर्व सोशल मीडिया अकाउंट्स बंद (suspend) करावीत अशीही मागणी संजय पाटील यांनी केली आहे. 



श्री. संजय पाटील यांचे संपूर्ण पत्र पुढीलप्रमाणे : 👇

 दिनांक ८ मे २०२४

 

प्रति,

मा. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त,

निर्वाचन सदन, अशोक रोड,

नवी दिल्ली ११०००१,

 

मा. पोलीस आयुक्त,

पोलीस आयुक्तालय,

महात्मा फुले मंडई, फोर्ट,

मुंबई ४००००१

 

मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य.

सामान्य प्रशासकीय इमारत, सहावा मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०००३२

 

मा. निवडणूक निर्णय अधिकारी,

२८ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ,

महापालिका इमारत, विक्रोळी (पूर्व), मुंबई.

 

यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!

 

विषय : भारतीय जनता पक्षाचे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. मिहिर कोटेचा आणि BJP4Mumbai या सोशल मीडिया अकाउंट विरोधात खोटी माहिती पसरवणे, दोन समाजांत तेढ निर्माण करणे, कायदा-सुव्यवस्था बिघडवणे व इतर गंभीर कृत्यांबाबत तक्रार अर्ज.

 

महोदय,

 

मी, संजय दिना पाटील, शिवसेना - महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. मिहिर कोटेचा आणि BJP4Mumbai हे सोशल मीडिया अकाउंट यांच्याकडून काही अत्यंत आक्षेपार्ह, कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या गोष्टी सातत्याने घडविल्या जात आहेत. सदर पत्राद्वारे मी आपणास कळवू इच्छितो की,

 

१) दिनांक ५ मे रोजी सायंकाळी उशिरा शिवसेनेची प्रचार पत्रके वाटण्यासाठी महविकास आघाडीचे काही कार्यकर्ते घाटकोपर पश्चिम येथील समर्पण या गुजरातीबहुल सोसायटीत जाऊ इच्छित होते. मात्र सोसायटीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना तिथे प्रवेश करण्यास मज्जाव केला. अखेर तिथे बाचाबाची झाली आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. याबाबतचे व्हिडिओ, बातम्या मी या पत्रासोबत देत आहे. [EXHIBIT-A]

 

२) दिनांक ४ मे रोजी उत्तर पूर्व मुंबईत माझ्याच नावाच्या ४ डमी उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले. या चारही उमेदवारांचे affidavit एकाच व्हेंडरकडून, एकाच दिवशी, एकाच व्यक्तीने, एकाच स्वाक्षरीने घेतले. याबाबत अनेक वर्तमानपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांवर बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. या चारही डमी उमेदवारांचे संबंधित affidavit मी सोबत जोडत आहे. या ४ डमी उमेदवारांपैकी २ जणांचे अर्ज पडताळणी प्रक्रियेत बाद झाले असले तरी आजही २ डमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  [EXHIBIT-B]

 

३) दिनांक ३ मे रोजी प्रचार करत असताना मी स्वतः वृत्तवाहिन्यांशी बोलताना "आप मशाल का बटण दबाके उनको (द्वेषभावना पसरवणाऱ्यांना) खतम कीजिए"असं आवाहन केलं होतं. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक ४ मे रोजी भाजपच्या BJP4Mumbai या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत फेसबुक आणि X अकाऊंटवरून "उद्धव ठाकरे यांना मुंबईतून हिंदूंना संपवायचे आहे का?" असा सवाल उपस्थित करणारे ग्राफिक प्रकाशित करण्यात आले आहे. संबंधित पोस्ट आजही भाजपच्या या व्हेरीफाईड पेजवर उपलब्ध आहे. माझा आक्षेप आहे की, भाजपची अधिकृत सोशल मीडिया टीम माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे. इतकंच नव्हे तर, आमचे आदरणीय नेते, शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा हिंदुद्वेष्टे म्हणून दाखवून त्यांची वैयक्तिक बदनामी करत आहे. भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटचा वापर अगदी निर्लज्जपणे आणि उघडपणे हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण करण्यासाठी केला जातोय. सोबत या मुद्द्याचे पुरावे सोबत जोडत आहे. [EXHIBIT-C]

 

४) सर्वात गंभीर बाब म्हणजे, १ मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे दिनांक ३० एप्रिल रोजी भाजपचे अधिकृत उमेदवार श्री. मिहिर कोटेचा यांनी एक व्हिडिओ स्वत:च्या फेसबुकवर पोस्ट केलाय, ज्यात ते म्हणतात की, "मी संजय पाटलांच्या टोपीवाल्या गुंडांना (म्हणजे मुसलमान नागरिकांना) ओपन चॅलेंज करतो की उद्या १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी परत एकदा खुलेआम मानखुर्दमधे येणार आहे. हिंमत असेल तर यावेळेस मात्र निशाणा चुकवू नका. समोरून वार करा, पाठीमागून नाही." तसंच, श्री. मिहिर कोटेचा यांनी कोणतेही कारण नसताना मानखुर्द- छत्रपती शिवाजी महाराज नगरचा उल्लेख 'मिनी पाकिस्तान' असाही केला! संबंधित पोस्ट आणि व्हिडिओ आजही त्यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजवर आहे. सोबत पुरावे जोडत आहे. [EXHIBIT-D]

 

५) दिनांक ३० एप्रिल रोजी भाजपचे उमेदवार श्री. मिहिर कोटेचा यांच्या प्रचारसभेवर "दगडफेक झाली नसून विटेचा तुकडा रॅलीच्या दिशेने आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत तक्रार नोंदवून घेत आहोत. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात येईल. याप्रकरणी अधिक चौकशी करत असल्याचे पोलीस उपायुक्त श्री. हेमराजसिंग राजपूत यांनी सांगितल्याची बातमी दैनिकात प्रकाशित झाली असून तीसुद्धा या पत्रासोबत जोडत आहे. [EXHIBIT-E]

 

उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून मराठी विरुद्ध गुजराती हा वाद आणि हिंदू विरुद्ध मुस्लिम यांच्यात वाद भडकून येथील शांतता भंग पावेल आणि दोन समाजांत तेढ निर्माण होईल असा प्रचार सातत्याने केला जात आहे. या संदर्भातील सर्व पुरावे मी या पत्रासोबत जोडत आहे.

 

माझी आपणास विनंती आहे की, भारतीय जनता पक्ष, त्यांचे उमेदवार श्री. मिहिर कोटेचा आणि त्यांचे सर्व संबंधित सोशल मीडिया अकाउंट्स यांविरोधात तसंच विशेषत: BJP4Mumbai या फेसबुक पेजवर आणि एक्स अकाउंटवर निवडणूक आयोगाच्या विविध मार्गदर्शक कायद्यांचा अवलंब करून कठोरात कठोर कारवाई करावी तसंच त्वरित ही सर्व सोशल मीडिया अकाउंट्स बंद (suspend) करावेत. संबंधित सर्वांवर दोन समाजात तेढ निर्माण करणे, सामाजिक सलोखा नष्ट करणे व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याबद्दल भा.दं.सं. १८६० व माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (IT Act) नुसार कारवाई करून गुन्हा नोंद करावा, ही विनंती.

 

धन्यवाद.

 

आपला विश्वासू,

संजय दिना पाटील

अधिकृत उमेदवार,

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे





Reflecting Reality Lok Sabha Candidates' Campaign Missteps Part 4

Final List of Mumbai North East District Lok Sabha Election Candidate's.




















 

Wishing you abundance and prosperity on Akshaya Tritiya.


Wishing you abundance and prosperity on Akshaya Tritiya. May this auspicious occasion bring you joy and success that never fades. May your life be filled with health, wealth, and happiness on Akshaya Tritiya and always. Wishing you and your family endless blessings and positivity on this special day.


 

Popular Posts