Monday, March 25, 2019

महिलांसाठी सरकारच्या कामामुळे निवडणुकीत भाजपाला अनुकूल वातावरण महिला - बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा विश्वास




महिलांच्या कल्याणासाठी तसेच ग्रामीण भागासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या अनेक कामांमुळे जनतेचा कौल भाजपाच्या बाजूने असून लोकसभा निवडणुकीत पक्षाचे अधिकाधिक खासदार निवडून येतील असा विश्वास राज्याच्या महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये आणि विश्वास पाठक उपस्थित होते.
मा. पंकजा मुंडे म्हणाल्या की, २०१४ च्या निवडणूकीत आम्ही तत्कालिन सरकारचे अपयश आणि आम्ही कोणती कामे करणार आहोत या मुद्यांवरून प्रचार केला होता. मात्र, या निवडणूकीत आमच्याकडे आमच्या कामांचा अहवाल आहे. आम्ही केलेली कामेही जनतेसमोर दिसत आहेत. या कामांमुळेच जनतेचा कौल भाजपाच्या बाजूने आहे.
त्यांनी सांगितले की, आपण जलसंधारण मंत्री असताना राज्यात जलयुक्त शिवार योजनेचे काम सुरू झाले. यावर्षी कमी पाऊस होऊनही जलयुक्त शिवार योजनेमुळे मार्च अखेरपर्यंत पाणी टंचाईचा सामना करणे सोपे झाले आहे. राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत आतापर्यंत कधीही रस्त्याने न जोडलेली गावे जोडण्यात यश आले. ग्रामपंचायतीत संरपंचपदासाठी थेट निवडणूक घेण्याचा निर्णय यशस्वी ठरला आहे. या निर्णयानंतर निवडून आलेल्या सरपंचांपैकी ६० टक्के सरपंच हे पदवीधर आहेत. यामध्ये महिला आणि तरूण सरपंचाची संख्या अधिक आहे. जिल्हा परिषद शिक्षकांची बदली ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या निर्णयामुळे या प्रक्रियेत पारदर्शिता आली आहे. ही बदली प्रक्रिया न्यायालयाकडूनही कायम झाली. बचतगटांसाठी शून्य टक्के व्याजदर कर्ज योजना, महालक्ष्मी सरस उपक्रम आणि अस्मिता योजना यासारख्या ग्रामीण भागातल्या महिला वर्गाला सक्षम करणाऱ्या योजनांनाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
त्या म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बेघरमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार आहे. मा. पंतप्रधानांच्या उपस्थितीत शिर्डीत लाखो घरकुलाचं वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर माझी कन्या भाग्यश्रीया योजनेमुळे राज्यात मुलींच्या जन्मदरात ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
(मुकुंद कुलकर्णी)
कार्यालय सचिव

Monday, February 11, 2019

मुलुंड पूर्व झोपडपट्टीस लागलेल्या आगीत तीन गॅस सिलेंडरचा स्फोट


मुलुंड पूर्व नवघर १ल्या गल्लीत झोपडपट्टीस लागलेल्या आगीत तीन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात ७ झोपड्या  जळून खाक झाल्या. सुदैवाने या स्फोट आणि आगीत जीवितहानी झाली नाही.
सात फायर इंजिन ३ पाण्याचे टॅंकर यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीमुळे येथील परिसरात घबराट उडाली.  घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्कराज सुर्यवंशी आणि  त्यांचे कर्मचारी जातीने हजर होते.






Popular Posts

On the 119th anniversary of Swami Vivekananda's death, his message continues to inspire.

  On the 119th anniversary of Swami Vivekananda's death, his message continues to inspire.  His teachings  emphasize the importance of s...