Monday, April 15, 2019
SUSHMA MOTILAL MOURYA FROM JAN ADHIKAR PARTY
LOK SABHA ELECTION 2019 CANDIDATE FROM MUMBAI NORTH-EAST DISTRICT SEAT NO 28. SYMBOL HELICOPTER
Sunday, April 14, 2019
Tuesday, April 2, 2019
निवडणूक कार्यालय 'राम भरोसे'
रविवार
दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजता २८ उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघाचे
मुलुंड विधान सभेतील, मुलुंड पूर्व, म्युनिसिपल मार्केट बिल्डिंग, चाफेकर बंधू मार्ग, खंडोबा मंदिर जवळील, निवडणूक कार्यालयास भेट दिली
असता तेथे कुणीही उपस्थित नव्हते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कार्यालय उघडे होते
मात्र तेथे कुणीही कर्मचारी, अधिकारी अथवा शिपाई देखील नव्हता. बहुतेक यालाच म्हणत
असावेत 'राम
भरोसे' !!
Sunday, March 31, 2019
ईशान्य मुम्बई जिला संसदीय क्षेत्र के उम्मीदवार संजय दीना पाटिल के लिये कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, रिपब्लिकन और म.न.से. गुटों का स्नेहसम्मेलन भांडुप में हुआ संपन्न।
बुधवार २७ मार्च २०१९, भांडुप,
मुंबई
- कांग्रेस,
राष्ट्रवादी कांग्रेस, रिपब्लिकन और म.न.से. गुटों के साथ समविचारी दलों के गठबंधन द्वारा स्थापित
संयुक्त पुरोगामी महागठबंधन के ईशान्य मुंबई जिला संसदीय क्षेत्र के उम्मीदवार
राष्ट्रवादी कांग्रेस के जिलाध्यक्ष एवं पूर्व सांसद संजय दीना पाटिल के चुनावी
कार्य एवं प्रचार के आरंभ के हेतु सभी दलों की पहली संयुक्त सभा, ‘स्नेहसम्मलेन’, का आयोजन भांडुप पश्चिम स्थित दीना बामा पाटिल इस्टेट के परिसर में संपन्न
हुआ। कार्यक्रम में भारी संख्या में महिलाएं एवं युवा कार्यकर्ताओ का सहभाग
रहा। आदर सत्कार से मित्रपक्ष का कोई भी
सदस्य वंचित या नाराज़ न हो इस बात का पूरा ध्यान स्वयं संजय दीना पाटिल एवं उनके
सहकारी रखते नजर आये। जिसका नतीजा यह रहा के सभा मंच पर कांग्रेस एवं मित्रपक्षों
के नेताओं को प्रमुख स्थान दिया गया और राष्ट्रवादी कांग्रेस के काफ़ी नेताओं ने
निचे जनता के बीच बैठे नजर आये।
पूर्व
मंत्री एवं मुम्बई राष्ट्रवादी कांग्रेस अश्यक्ष सचिन आहिर के साथ मुम्बई कांग्रेस
के नवनियुक्त अध्यक्ष मिलिंद देवड़ा ने दिल्ली से आने में देरी होने के कारण सचिन
अहीर के फोन के स्पीकर से सभा को संबोधित किया और समस्त कांग्रेस पार्टी के
कार्यकर्ता राष्ट्रवादी और मित्रपक्षों से साथ कंधे से कन्धा मिलाकर संजय पाटिल को
ईशान्य मुम्बई संसदीय क्षेत्र से विजयी करेंगे ऐसा आश्वासन दिया।
पूर्व
विधायक किरण पावसकर,
पूर्व विधायक चरण सिंग सप्रा, पूर्व विधायक अशोक धात्रक, पूर्व विधायक
वीरेंद्र बक्षी,
ईशान्य मुम्बई जिला कांग्रेस के नवनियुक्त अध्यक्ष प्रणिल
नायर,
ईशान्य मुम्बई जिला चुनाव प्रचार समिति के अध्यक्ष सुरेश
कोपरकर,
रिपब्लिकन पार्टी गवई गुट के प्रदेश अध्यक्ष आनंद खरात, पूर्व नगरसेवक बी. के तिवारी, जिला कांग्रेस चुनाव प्रचार समिति के सह निमंत्रक राजेश इंगले एवं रमेश शाह, आदि मान्यवरों ने भी इस स्नेहसम्मेलन को संबोधित किया। संजय
दीना पाटिल परिवार,
सहकारी एवं राष्ट्रवादी के कार्यकर्ताओं ने इस स्नेहसम्मेलन
का नियोजन किया था।
Monday, March 25, 2019
भाजपा शिवसेना महायुतीच्या शुभारंभाच्या सभेला विराट जनसागर लोकसभा निवडणुकीत विजय पक्का असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
Photo Credit to The Asian Age
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश स्वाभिमानाने उभा असून पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली
भाजपा शिवसेना महायुतीचे भक्कम सरकार सत्तेवर आणण्याचा जनतेचा निर्णय झाला आहे.
महायुतीच्या प्रचाराच्या पहिल्या जाहीर सभेसाठी जमलेला लोकांचा महासागर महायुतीचा
लोकसभा निवडणुकीत विजय पक्का असल्याची ग्वाही देत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोल्हापूर येथे
केले. देव – देश – धर्मासाठी जनतेच्या इच्छेनुसार शिवसेना भाजपाची युती झाली असून शुभारंभाच्या
सभेसाठी झालेल्या गर्दीचे अभूतपूर्व दृश्य हे विजयाची मुहूर्तमेढ रोवणारे आहे, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता
पार्टी, शिवेसना, रिपब्लिकन पार्टी (आठवले), राष्ट्रीय
समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत
क्रांती महायुतीची लोकसभा निवडणूक प्रचाराची सभा कोल्हापूर येथे झाली. मा.
देवेंद्र फडणवीस व मा. उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ वाढवला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष
खा. रावसाहेब पाटील दानवे, महसूलमंत्री
चंद्रकांतदादा पाटील, रिपब्लिकन पक्षाचे
अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रासपचे अध्यक्ष पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे, रयत क्रांतीचे प्रमुख कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री
सुभाष देशमुख, जलसंपदामंत्री
गिरीश महाजन, अन्न व नागरी
पुरवठामंत्री गिरीश बापट, शिवसेना नेते
आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री
सुभाष देसाई, केंद्रीय मंत्री
अनंत गीते, परिवहनमंत्री
दिवाकर रावते, सामाजिक न्याय
राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा
राज्यमंत्री विजय शिवतारे, गृहराज्यमंत्री
दीपक केसरकर, खा. विकास
महात्मे, उमेदवार खा. संजयकाका पाटील, संजय मंडलिक व
धैर्यशिल माने उपस्थित होते.
मा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ले झाले त्यावेळी त्या वेळच्या काँग्रेस आघाडी
सरकारने केवळ पाकिस्तानचा निषेध केला. उरी आणि पुलवामा येथे दहशतवादी हल्ले
झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंमत दाखवली आणि सैन्याला पूर्ण मोकळीक
दिली आणि सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले.
सेनेच्या पराक्रमाबद्दल विरोधी पक्षांना शंका आहे. विरोधकांची संवेदना भारतीय जनता
आणि सैन्यासोबत नाही तर पाकिस्तानसोबत आहे. पण हा मोदीजींच्या नेतृत्वाखालील नवा
भारत आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली पुन्हा मजबूत सरकार सत्तेवर आणायचे आहे.
त्यांनी
सांगितले की, देशप्रेमाने
भरलेल्या भाजपा शिवसेना महायुतीचा सामना करण्याची विरोधी काँग्रेस राष्ट्रवादी
काँग्रेस आघाडीची हिंमत नाही. त्यांच्या कॅप्टननेच माढ्यातून माघार घेतली. त्यांचे
उमेदवार तिकिटे परत करत आहेत. पश्चिम महाराष्ट्राने त्यांना भरभरून दिले पण
त्यांनी समस्या सोडवल्या नाहीत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना
आपले खुले आव्हान आहे की, त्यांची पंधरा
वर्षांची राजवट आणि महायुतीचे साडेचार वर्षांचे सरकार यांची तुलना करणारी जाहीर
चर्चा करावी. पश्चिम महाराष्ट्रासोबत संपूर्ण महाराष्ट्रात युती सरकारने सिंचन, रस्ते यासाठी जास्त काम केले आहे. ऊस शेतकऱ्याला मदत केली आहे. रखडलेले सिंचन
प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दहा जागा महायुती
जिंकेलच व त्यासोबत संपूर्ण राज्यात जनता युतीला पाठिंबा देईल.
मा. उद्धव
ठाकरे म्हणाले की, महायुतीला विरोध
करायला ५६ पक्ष एकत्र आले आहेत पण अजूनही त्यांच्यात भांडणे चालू आहेत. नरेंद्र
मोदी हे आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरले आहेत पण विरोधकांचे कोण आहेत हा प्रश्न
आहे. मोदींचे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी काम करत आहे. शेतकऱ्यांचे व मुंबईचे
प्रश्न आपण मांडले तर मुख्यमंत्र्यांनी त्यावर निर्णय घेऊन कारवाई केली. आपल्याला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिमान वाटतो. त्यांनी शब्द दिला व पाळला.
आम्ही देव, देश आणि धर्मासाठी
युती केली आहे. गरिबांचे भले करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे.
दलित समाज, आरक्षण आणि संविधानाच्या संरक्षणासाठी मा. नरेंद्र मोदी यांना पुन्हा
पंतप्रधान करावे, असे आवाहन मा.
रामदास आठवले यांनी दलित व बौद्ध समाजाला केले. देशाला सुरक्षित ठेवणारे सरकार
देण्यासाठी मा. मोदी यांना पाठिंबा देऊन रासपाचे सर्व सैनिक काम करतील, अशी ग्वाही महादेव जानकर यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनीच शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे, असे प्रतिपादन सदाभाऊ खोत यांनी केले.
मा.
चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, युतीच्या प्रचाराचा नारळ वाढविण्याची ही सभा विक्रमी झाली आहे. ही निवडणूक देशाच्या सुरक्षिततेसाठी
महत्त्वाची आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दहा जागा युती जिंकेल.
भाजपा प्रदेश
सरचिटणीस आ. सुरेश हाळवणकर यांनी सूत्रसंचालन केले. माथाडी कामगारांचे नेते
नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.
( मकुंद कुलकर्णी
)
कार्यालय सचिव
महिलांसाठी सरकारच्या कामामुळे निवडणुकीत भाजपाला अनुकूल वातावरण महिला - बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा विश्वास
महिलांच्या कल्याणासाठी तसेच ग्रामीण भागासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने
केलेल्या अनेक कामांमुळे जनतेचा कौल भाजपाच्या बाजूने असून लोकसभा निवडणुकीत
पक्षाचे अधिकाधिक खासदार निवडून येतील असा विश्वास राज्याच्या महिला व बालकल्याण
आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये आणि विश्वास पाठक उपस्थित होते.
मा. पंकजा मुंडे म्हणाल्या की, २०१४ च्या निवडणूकीत आम्ही तत्कालिन सरकारचे अपयश आणि आम्ही
कोणती कामे करणार आहोत या मुद्यांवरून प्रचार केला होता. मात्र, या निवडणूकीत आमच्याकडे आमच्या कामांचा अहवाल आहे. आम्ही
केलेली कामेही जनतेसमोर दिसत आहेत. या कामांमुळेच जनतेचा कौल भाजपाच्या बाजूने
आहे.
त्यांनी सांगितले की, आपण जलसंधारण मंत्री असताना राज्यात जलयुक्त शिवार योजनेचे काम सुरू झाले.
यावर्षी कमी पाऊस होऊनही जलयुक्त शिवार योजनेमुळे मार्च अखेरपर्यंत पाणी टंचाईचा
सामना करणे सोपे झाले आहे. राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत आतापर्यंत
कधीही रस्त्याने न जोडलेली गावे जोडण्यात यश आले. ग्रामपंचायतीत संरपंचपदासाठी थेट
निवडणूक घेण्याचा निर्णय यशस्वी ठरला आहे. या निर्णयानंतर निवडून आलेल्या
सरपंचांपैकी ६० टक्के सरपंच हे पदवीधर आहेत. यामध्ये महिला आणि तरूण सरपंचाची
संख्या अधिक आहे. जिल्हा परिषद शिक्षकांची बदली ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या
निर्णयामुळे या प्रक्रियेत पारदर्शिता आली आहे. ही बदली प्रक्रिया न्यायालयाकडूनही
कायम झाली. बचतगटांसाठी शून्य टक्के व्याजदर कर्ज योजना, महालक्ष्मी सरस उपक्रम आणि अस्मिता योजना यासारख्या ग्रामीण
भागातल्या महिला वर्गाला सक्षम करणाऱ्या योजनांनाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
त्या म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बेघरमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार आहे.
मा. पंतप्रधानांच्या उपस्थितीत शिर्डीत लाखो घरकुलाचं वाटप करण्यात आले आहे.
त्याचबरोबर ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेमुळे राज्यात मुलींच्या जन्मदरात ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
(मुकुंद कुलकर्णी)
कार्यालय सचिव
Monday, February 11, 2019
मुलुंड पूर्व झोपडपट्टीस लागलेल्या आगीत तीन गॅस सिलेंडरचा स्फोट
मुलुंड पूर्व नवघर १ल्या गल्लीत झोपडपट्टीस लागलेल्या आगीत तीन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात ७ झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या स्फोट आणि आगीत जीवितहानी झाली नाही.
सात फायर इंजिन ३ पाण्याचे टॅंकर यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीमुळे येथील परिसरात घबराट उडाली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्कराज सुर्यवंशी आणि त्यांचे कर्मचारी जातीने हजर होते.
Sunday, February 10, 2019
साध्या फोनवरूनही पैसे पाठविणे आता अधिक सोपे आणि अधिक सुरक्षित!
कौशल्यविकास आणि उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मितेश ठक्कर
कल्पकता, संघटनकौशल्य आणि समाजोपयोगिता या निकषांवर महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2019 मध्ये एकूण 1600 स्पर्धकांमधून 24 कंपन्यांची पुरस्कारासाठी निवड झाली. त्यात मिंकव्हिल या कंपनीच्या ‘मिसकॉलपे’ (MissCallPay) या अभिनव प्रकल्पाला पुरस्काराबरोबरच
तीन गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी शासनाची पंधरा लाख रुपयांची ऑर्डरही मिळाली. या गावंमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवला जाईल. त्याबरोबरच त्याला एनपीसीआय आणि बँकांशी जोडण्यासाठीही शासनानं अनुकूलता दर्शवली आहे.
मुंबईतल्या मितेश ठक्कर यांनी विकसित केलेल्या ‘मिसकॉलपे’ या तंत्रज्ञानामुळे
देशभरात पेमेंट किवा पैसे देण्याची क्रिया अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. एवढंच नाही, तर त्यामुळे व्यापाऱ्यांचा ‘पॉईंट ऑफ सेल’ किंवा विक्री केंद्राच्या यंत्रणेवरचा खर्च केवळ शंभर रुपयांपर्यंत खाली येणार आहे.
मिसकॉल पे नेमकं आहे तरी काय? एक काळ असा होता की आर्थिक व्यवहार रोकड वापरुनच केले जायचे. गेल्या काही वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकारानं भारतात डिजिटल अर्थव्यवहाराचं प्रमाण वाढलं. त्यामुळे रोकड वापरुन केलेल्या व्यवहारातली जोखीम कमी झाली. अर्थव्यवहारात सुलभता आली. मात्र त्यातही ‘पीओएस’ यंत्रांची किंमत जास्त असल्यामुळे कार्ड स्वाईप करण्याची सोय अद्याप सर्वत्र म्हणावी तशी उपलब्ध झालेली नाही. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जियो कंपनीनं 3000 रुपयांना पीओएस यंत्र उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. मात्र, मितेश ठक्कर यांच्या मिसकॉलपे यंत्रणेमुळे बँकांच्या सहकार्यानं इंटरनेटवर पीएसओची निर्मिती होणार आहे. त्याचा दरमहा खर्च असेल, केवळ शंभर रुपये! मिसकॉल पेच्या स्वनिर्मित तंत्रज्ञानामुळे रोकड हा अर्थव्यवहाराचा प्रमुख मार्ग न राहता वापरकर्त्यांना सुलभ डिजिटल पर्याय उपलब्ध होईल. एवढंच नाही, तर वापरकर्त्याला बँकेची कामं किंवा इतर अर्थव्यवहार सहज आणि सुरक्षितपणे आपले कुटुंबीय किंवा मित्र यांच्या मदतीनं करणं सहज शक्य होईल. स्मार्टफोनच्या दिवसागणिक वाढणाऱ्या वापरामुळे डिजिटल पेमेंटच्या पर्यायांमध्येही
वेगानं वाढ होतेय. पे टीएम, गूगल पे, फोन पे, अमेझॉन पे असे अनेक पर्याय उपलब्ध होतायत. आता व्हॉटस अॅप पेसुद्धा सुरु होण्याच्या मार्गावर आहे. पण या सगळ्या सुविधा आणि मिसकॉल पे यांच्यात एक महत्वाचा फरक आहे. मिसकॉल पे साठी तुम्हाला कोणतंही अॅप वापरण्याची गरज नाही. एवढंच नाही, तर इंटरनेटचीही गरज नाही. यात तुम्हाला फक्त मिसकॉल पे च्या वेबसाईटवर नोंदणी करायची आहे. तुम्ही आवश्यक ते तपशील दिल्यानंतर तुमचं बँक खातं मिसकॉल पे शी जोडलं जाईल. त्यानंतर केव्हाही कुणालाही पैसै द्यायचे असतील, तर तुम्ही फक्त एका नंबरवर मिसकॉल द्यायचा. मिसकॉल दिल्यावर तुम्हाला तुमच्या बँकेतून फोन येईल आणि तुम्हाला करायच्या असेलेल्या पेमेंटविषयी तपशीलांची खातरजमा करुन घेतली जाईल. बस्स. आता तुम्ही निश्चिंत रहायचं, तुमची बँक पैसे हव्या त्या खात्यात जमा करेल. सध्या याच्या प्रात्यक्षिकासाठी 08066740740 हा मोबाईल क्रमांक उपलब्ध आहे. मिसकॉल दिल्या नंतर त्याच नंबर वरून तुम्हाला कॉल येईल व विशिष्ट व्यक्तीला पैसे देण्याची खात्री करून घेतली जाईल. जर पैसे वळते करावयाचे असतील तर ४ अंकी upi दाबा किंवा कॉल कट करा. ह्या डेमो नंबर करिता upi पिन आहे 1111.
ऑनलाईन पैसे ट्रानस्फर करताना चुकीचा खाते क्रमांक टाईप होणं किंवा चुकीचा मोबाईल क्रमांक टाईप झाल्यामुळे पैसे दुसऱ्यालाच मिळणं अश्या मानवी त्रुटींना यात जागाच नाही. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अनियमित वीजपुरवठ्यामुळे
इंटनरनेटच्या वापरावर मर्यादा आहेत. शिवाय, अनेक ज्येष्ठ नागरिकांना इंटरनेट वापरणं त्रासदायक वाटतं ही वस्तुस्थिती आहे. मिसकॉल पे वापरण्यासाठी इंटरनेटची गरज नसल्यामुळे ही समस्या सुटायला मदत होणार आहे.
या प्रक्रियेत एमडीआर (व्यापारी सवलत दर) म्हणजेच ग्राहकाच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डाचा वापर करण्याचा मोबदला म्हणून बँक व्यापाऱ्यांना आकारत असलेलं शुल्क, अगदी अत्यल्प असेल. शिवाय कंपनीनं व्यापाऱ्यांच्या विक्री आणि विपणनाला चालना देण्यासाठी काही अॅप्लिकेशन्सही विकसित केलेली आहेत. या अॅप्लिकेशन्समुळे
मोठ्या व्यापाऱ्यांसाठी ग्राहकांनी व्यापाऱ्यांच्या वेबसाईटला दिलेली भेट आणि प्रत्यक्ष विक्री यांचा दर तब्बल 600 टक्क्यांनी वाढला तसंच व्यापाऱ्यांचा कॉल सेंटरवरचा खर्च ऐंशी टक्क्यांनी कमी झाला, असं कंपनीचं म्हणणं आहे.
अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या कंपनीच्या अॅप्लिकेशन्सना गोदरेज सिक्युरेटीज, आयसीआयसीआय होम फायनान्स आणि युरेका फोर्ब्स सारखे प्रतिष्ठित ग्राहक मिळाले आहेत.
मिसकॉल पे ला केंद्र सरकारच्या डिजी धन अभियानाच्या प्रमुखांकडून तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाक़डून पाठिंबा दर्शवणारी पत्रं मिळाली आहेत. मिसकॉल पे नं सोलापूर जनता सहकारी बँकेसह या प्रकल्पाला प्रायोगिक तत्वावर सुरुवातही केली आहे.
मिसकॉल पे ला केंद्र सरकारच्या डिजी धन अभियानाच्या प्रमुखांकडून तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाक़डून पाठिंबा दर्शवणारी पत्रं मिळाली आहेत. मिसकॉल पे नं सोलापूर जनता सहकारी बँकेसह या प्रकल्पाला प्रायोगिक तत्वावर सुरुवातही केली आहे.
आयआयएम अहमदाबाद आणि आयआयटी मुंबईची मान्यता प्राप्त केलेल्या मिसकॉल पे ला अमेरिकन एमआयटीची मान्यतीही मिळालेली आहे. तसंच मिसकॉल पे नं फिन्टिग्रेट झोन 2019 या मेळाव्यात पहिल्या पन्नास स्टार्टअप्समध्ये स्थान पटकावलंय.
महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2019 महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्थेतर्फे (MsInS) आयोजित महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2019 चा उद्देश राज्यातल्या उद्योजकांना प्रोत्साहन देणं, एकत्र आणणं आणि सक्षम बनवणं हा आहे. या उपक्रमामुळे राज्यभरातल्या विविध उद्योजकांना त्यांच्या नवनवीन उद्यम-कल्पना शासनासमोर आणण्याची संधी मिळते. शासनाला यातले काही उद्योग राबवण्याच्या शक्यतांची चाचपणी करता येते, त्याच्या व्यवसायाच्या विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होतात, तसंच महाराष्ट्राला स्टार्टअपसाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून प्रस्थापित करण्यात या उद्योजकांचा हातभार लागतो.
या सप्ताहात सहभागी झालेल्या 1600 स्टार्टअप उद्योगांमधून निवडलेल्या 24 उद्योगांना शासनाकडून प्रत्येकी पंधरा लाख रुपयांचे कार्यादेश मिळणार आहेत. त्यातून त्यांना तंत्रज्ञानाच्या
माध्यमातून ग्रामीण जनतेसाठी सातत्यपूर्ण विकास उद्दिष्टं साध्य करण्यात शासनासह काम करणं शक्य होईल.
Subscribe to:
Posts (Atom)
Popular Posts
-
PRESS-NOTE On 04/11/2011 at about 12.15 hours, three unknown persons came in a numberless M/Cycle and fired two rounds at the office of ...
-
Imagine a same brand, same quantity, same packing having double MRP (Maximum Retail Price) in Mall then the MRP it has for selling in small...
-
CAR of BJP MLA SARDAR TARASINGH crashed into Mulund Traffic Chowky The Driver of a Vehicle belonging to BJP MLA SARDAR TARASINGH crash...
-
http://electionmsd.blogspot.in/
-
The Plant & Animals Welfare Society – Mumbai (PAWS-Mumbai) is a registered organisation that was founded in 2002 by some likeminded yout...