Friday, May 17, 2024

मोदीच्या राज्यात जीवांची गॅरंटी शुन्य

 मुंबई, दि. 15 (प्रतिनिधी) – मोदी की गॅरंटी, म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या राज्यात लोकांच्या जीवांची कोणतीही गॅरंटी राहिली नाही. मोदी की झिरो गॅरंटी, अशी म्हणण्याची वेळ आता देशातील नागरिकांवर आली आहे, अशी घणाघाती टीका ईशान्य मुंबईतील मतदारांनी केली आहे.

 केवळ मतांसाठी मुंबईत आलेल्या नरेंद्र मोदी यांना मुंबईकरांची काळजी नसल्याचे दिसून आले आहे. घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू तर 70 हुन अधिक नागरिक जखमी झाले असतानाही नरेंद्र मोदी यांना जखमींना हॉस्पिटल मध्ये जाऊन भेटण्यास वेळ मिळाला नाही. सतत राजकारण करणा-या मोदींनी केवळ रोड शो करीत मतांचा जोगवा मागण्यात धन्यता मानली, असा आरोप ईशान्य मुंबईतील मतदारांनी केला.

 ईशान्य मुंबईतून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी भाजपा समोर कडवे आव्हान उभे केल्याने ईशान्य मुंबईची जागा गमवावी लागण्याचे चिन्ह आता भाजपाला दिसू लागले आहेत. त्यामुळे घाबरलेल्या भाजपाने थेट काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच प्रचारासाठी रस्त्यावर आणले. माझा देश माझा परिवार असा नारा देणा-या पंतप्रधानांना अपघातग्रस्तांचा परिवार हा आपला वाटला नाही. मोदी की गॅरेन्टी देणारा भाजप आज लोकांच्या जीवाची गॅरेन्टी देत नाही. असा आरोप ईशान्य मुंबईतील नागरिकांनी केला आहे

 काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो मुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तवर गांधीनगर, घाटकोपर भागाला जोडणारे सर्व रस्ते बंद केले होते. सर्व वाहतूक वेगवेगळ्या मार्गाने फिरविल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. यावर मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

संजय भाऊंना मिळणार राजा ढाले व आठवले गटाची मतं

 



मुंबई, दि. 15 (प्रतिनिधी) – स्वर्गिय राजा ढाले प्रतिष्ठानच्या सर्वेसर्वा अँड. गाथा ढाले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अनिल ओव्हाळ यांनी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

 गाथा ढाले आणि अनिल ओव्हाळ यांनी भाडुंप येथे संजय दिना पाटील  यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहिर केला. यावेळी संजय दिना पाटील यांची कन्या राजोल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. स्वर्गिय राजा ढाले यांना मानणारा एक मोठा वर्ग घाटकोपर, चेंबुर, गोवंडी, विक्रोळी, भांडुप व मुलुंड भागात आहे. दरम्यान राजा ढाले यांनी रामदास आठवले यांना घडविले आहे. त्यामुळे आठवले गट हा राजा ढाले प्रतिष्ठानशी विविध कार्याच्या माध्यमातून कायम जोडला गेला आहे. मुंबई मराठी माणसांची राहिली पाहिजे आणि संविधान वाचविण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना पाठिंबा देत आहोत असे गाथा ढाले यांनी सांगितले.

 भाजपच्या गुजरात धार्जिण्या राजकारणामुळे मराठी माणुस मुंबईच्या बाहेर फेकला जात आहे. मराठी माणसांची कामे ईशान्य मुंबईत गेल्या दहा वर्षात झालेली नाही. याअगोदर भाजपच्या दोन्हीही गुजराती खासदारांनी मराठी माणसांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मराठी माणुस भाजपच्या गुजराती धार्जिण्या राजकारणामुळे अस्वस्थ आहे. त्यात ईशान्य मुंबईतील मागासवर्गीय वस्त्यांकडे भाजपच्या गुजराती खासदारांनी नेहमीच पाठ फिरवली. त्यांनी कोणतीही विकासाची कामे मागासवर्गीय भागात केलेली नाही. यामुळे मागासवर्गीय भागात भाजपच्या उमेदवाराविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. असा आरोप गाथा ढाले आणि अनिल ओव्हाळ यांनी यावेळी केला.


मोदींचा रोड शो ठरला फ्लॉप शो

मोदींचा रोड शो ठरला फ्लॉप शो
रेल्वे, मेट्रो सेवा बंद केल्याने मुंबईकरांनी वाहिल्या लाखोल्या
कोणतीही पुर्व सुचना न देता रेल्वे व मेट्रो सेवा बंद
प्रवाशांनी रेल्वे ट्रॅक मधून चालत घर गाठले







मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) – घाटकोपर येथे मोदींच्या रोड शो मुळे मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांच्या रोड शो मुळे मेट्रो आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. याबाबतची कोणतीही पुर्व सुचना प्रवाशांना न दिल्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुडुंब गर्दी दिसून येत होती. त्यामुळे मतांचा जोगवा मागण्यासाठी मुंबईत आलेल्या पंतप्रधान मोदींना मुंबईकरांनी लाखोल्या वाहिल्या.

लोकसभेच्या मुंबईतील सहाही जागांवर संक्रांत आली असून भाजपच्या उमेदवारांनी नाराज असलेल्या मुंबईकरांची मतं मिळविण्यासाठी पंतप्रधान मोदींनाच रस्त्यावर आणले. घाटकोपर मध्ये त्यांचा रोड शो करण्यासाठी पोलिसांनी अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करुन इतरत्र वळविले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. त्यातच कोणतीही पुर्व सुचना न देता सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मेट्रो व रेल्वे सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे कामावरुन घरी जाणा-या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. लाखो प्रवाशी दोन तासांहुनही अधिक काळ रेल्वे स्थानकावर अडकुन पडले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने घामाघुम झालेल्या मुंबईकरांनी भाजपच्या नावाने लाखोल्या वाहण्यास सुरवात केली. लहान मुले, गरोदर महिला, आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना मोदींच्या रोड शोने प्रचंड मनस्थाप सहन करावा लागला. नाईलाजाने प्रवाशांना रेल्वे ट्रक मधून चालत आपल्या नियोजित स्थळी जावे लागत होते. रेल्वे विभागाकडून रेल्वे सेवा बंद करण्याच्या सुचनाही प्रवाशांना दिल्या जात नव्हत्या. त्यामुळे नेमके काय झाले याबाबत मुंबईकर प्रवाशी संभ्रमात पडले होते. तर दुसरीकडे भाजपच्या उमेदवारांसाठी मतांचा जोगवा मागण्यासाठी रोड शो करणा-या भाजपच्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्णय संतप्त प्रवाशांनी घेतला. त्याबाबत अनेक प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला.

दरम्यान मोदींनी मुंबईत रोड शो केल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येईल अशी सर्वाची अपेक्षा होती. मात्र परिस्थिती उलटी झाली. भाजपला मिळणारे मतं ही आता कमी होणार असून त्यांच्या मुंबईतील सर्व जागा अडचणीत आल्या असल्याचे जाणकारांचे मत आहे. तर दुसरीकडे घाटकोपर दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढत असताना मोदींनी रुग्णालयात जाऊन त्यांची चौकशीही केली नाही. किंवा मृतांच्या नातेवाईकांना भेटण्याची तसदीही घेतली नाही. केवळ मतांसाठी मुंबईत आलेल्या मोदींना या रोड शोचा काहीच फायदा होणार नसल्याचे लोकांनी सांगितले.




Popular Posts

Maharashtra Gets Its First ‘Always-On Discount’ Retail Destination as Outlet Mall of India Unveiled in Mumbai

Photo credit: Rajesh Dabhade Mumbai, March 31, 2026: In a significant boost to Maharashtra’s retail and lifestyle landscape, Bhu...