Thursday, January 17, 2019

Generico launches 25th outlet in Mumbai, crosses 2,00,000 customer milestone

Mumbai, January 17, 2019: Mumbai-based retail pharmacy chain Generico has launched its 25th outlet today. Inaugurated by the hands of Corporator Ward no 62 Mrs. Anjali Ajay Walunj and Vashi Taluka President (Block - Congress) Shree Vijay Sakharam Walunj. Generico is looking to further expand its footprint with its latest outlet in Sector 2, Vashi, Navi Mumbai.

          ·  Mumbai-based Generico is among the fastest growing chain of retail pharmacies
·  It provides high quality and affordable generic medicines
·  Founded in 2017, the company has gained over 2 lakh customers till date


In India, where healthcare and medication expenditure by people often causes a large dent in hard earned savings, Generico is a social initiative which aims to create maximum benefit for patients and the general public by providing quality and affordable medication to them. Research by the Public Health Foundation of India indicates that, in a year alone, 55 million Indians bore the brunt of poverty, having funded their own healthcare.



Founded in 2017 by IIT Bombay alumni, Girish Agarwal and Siddharth Gadia, Generico specializes in the sale of generic medicines sourced directly from WHO/GMP certified manufacturing facilities. Today, there are approximately 70% generic equivalents available in the market which Generico plans to increase to over 90% whilst ensuring high quality and affordability. In-depth training to nearly 300 employees enables them to provide in-store counselling to customers to address any concerns regarding generic generics. Additionally, local self-help groups, NGOs, doctors, housing colonies, etc. are also involved in creating awareness about generic drugs.





जेनेरीकोची मुंबईतील २५वी शाखा सुरु. दोन लाख ग्राहकांचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडला.
·  मुंबईस्थित जेनेरीको ही सर्वात वेगाने वाढणारी औषध दुकान श्रुंखला.
·  उच्च दर्जाची आणि परवडणारी जेनेरिक औषधे उपलब्ध
·  २०१७ साली स्थापना झाल्यापासून आजपर्यंत दोन लाखांहून अधिक ग्राहक.



मुंबई, जानेवारी १७, २०१९: मुंबईस्थित औषध दुकान श्रुंखला जेनेरीको ने आज आपली २५वी शाखा सुरु केली. वाशीच्या सेक्टर येथे असलेल्या ह्या शाखेचे उद्घाटन नवी मुंबईचे वोर्ड क्र 62 च्या नगरसेविका सौ.अंजली अजय वाळुंज (वाशी तालुका अध्यक्ष(ब्लॉक - काँग्रेस), श्री विजय सखाराम वाळुंज यांच्या हस्ते झाले. येत्या काळात जेनेरीकोचा नवी मुंबईच्या इतर भागांत विस्तार करण्याची योजना आहे.

भारतात औषधोपाराच्या खर्चाने घराचे बजेट कोलमडते आणि मेहनतीने केलेली बचत बघता बघता खर्च होते. जनतेला तसेच रुग्णांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देऊन त्यांचा अधिकाधिक फायदा करून देण्याच्या उद्देशाने सुरु केलेली सामाजिक चळवळ आहे. पब्लिक हेल्थ फौंडेशन ऑफ इंडिया ने केलेल्या संशोधनानुसार भारतात दर वर्षी  ५५ दशलक्ष लोक गरिबीमुळे आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत.
आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी गिरीश अग्रवाल आणि सिध्दार्थ गडिया यांनी २०१७ मध्ये हा उपक्रम सुरु केला. WHO/GMP द्वारे प्रमाणित औषध उत्पादकांकडून उपलब्ध जेनेरिक औषधे थेट ग्राहक/रुग्णांपर्यंत पोहोचविणे ही जेनेरीकोची विशेषतः आहे. आज बाजारात ७०% ब्रांडेड औषधांचे जेनेरिक पर्याय उपलब्ध आहेत, जे उच्चदर्जा आणि परवडणाऱ्या किमतीत ९०% पर्यंत वाढविण्याची जेनेरीकोची योजना आहे.  जवळपास ३०० कर्मचाऱ्यांना, जेनेरिक औषधांबाद्द्लच्या ग्राहकांच्या शंकांचे निरसन करणे सोडविणे आणि सल्ला देण्यासाठी, सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय, स्थानिक बचत गट, अशासकीय संस्था, डॉक्टर्स, गृहनिर्माण संस्था देखील जेनेरिक औषधांबद्दल जनजागृती करत आहेत.
आजवर मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे जेनेरीकोचे दोन लाख ग्राहक आहेत, आणि २०१९च्या शेवटपर्यंत १०० शाखांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट आहे.


Thursday, January 3, 2019

बाथरूम मध्ये गुदमरून मृत्यू



नव वर्षाचे स्वागत लोणावळा येथे करून १ जानेवारी २०१९ रोजी मुलुंड येथील राहत्या घरी परतलेली २१ वर्षीय ईशानी नितीन गाला थकली होती आणि आंघोळ करून फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेली. मात्र व्हेंटिलेशन, खिडकी बंद असल्यामुळे व त्यात भर म्हणजे गिझर मधून गरम पाण्याच्या प्रवाहामुळे निर्माण झालेली उष्णता आणि बाष्प निर्मितीमुळे ईशानीचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर घटनेबाबत प्राथमिक चौकशी मधये काहीही संशयास्पद न आढळल्याचे पोलीस चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Friday, December 28, 2018

अग्निशमन फायर हायड्रंट गायब !



मुलुंड पश्चिमेस पाच रास्ता येथील महर्षी अरविंद चौक येथील पंचशील नर्सिंग होम, एम.जी. रोड, बिलेश्वर महादेव मंदिराच्या बाजूस असलेल्या टेलिफोन बूथ समोर वर्षानुवर्षे जनसेवार्थ उभा असलेला हा अग्निशमन फायर हायड्रंट एप्रिल २०१८ रोजी एका अवजड वाहनाच्या धडकेमुळे वाकला होता.  आज त्याठिकाणाहून तो गायब झाला आहे. सदर अग्निशमन फायर हायड्रंट चोरीस गेला कि महानगरपालिकेच्या संबंधीत विभागाने त्यास काढून घेतले आहे हे जरी स्पष्ट नसले तरी एक मात्र खरे गेले मुलुंड पश्चिम येथील या चौकस कडी आग लागली तर ती विझवण्यास अग्निशमदलास तत्परतेने सेवार्थ कैक दशके निस्वार्थपणे उभा असलेला हा अग्निशमन फायर हायड्रंट शाहिद झाला आहे.  टी विभाग कार्यालयाच्या संबंधित विभागाने या गायब झालेल्या अग्निशमन फायर हायड्रंटची नोंद घेतली असावी हीच अपेक्षा!

Wednesday, December 26, 2018

पिण्याचे पाणी असे वाया जात आहे!


जे.एन. मार्ग आणि झवेर रोड जंक्शन येथील गीता कलेक्शन दुकानासमोरील रस्त्याच्या खाली असलेली पिण्याच्या पाण्याची मनपा पाईपलाईन कित्येक दिवस फुटली असून त्यातुन दिवसरात्र पाणी वाहून वाया जात आहे. काँक्रीटच्या रासत्यमधून पाणी झिरपत असल्यामुळे खाली असलेली पाईपलाईन चांगलीच फुटली असावी कारण त्यामुळेच हे पाणी काँक्रीट मधून वाट करीत रस्त्यावर वाहत आहे.

सरकार आणि मनपा द्वारे पाण्याच्या अपव्यय टाळण्याचे वारंवार आवाहन होत असताना मनपा पाणी विभाग आणि अपत्कालीन विभाग याकडे डोळेझाक करीत आहेत हे नवलच!


Friday, December 14, 2018

सदर पदपथावर चालणे हानिकारक !!


मुलुंड पश्चिम येथील साईधाम परिसर असून  येथील पी.के. मार्ग लागत असलेल्या पदपथावरील नाल्याचे ढाकणे तुटलेले आहे. सर परिसरात तीन शाळा आहेत व त्यांची भरण्याची व सुटण्याची वेळ देखील जवळपास सारखीच आहे. शाळेत जाणारी मुलं किंवा त्यांचे पालक अथवा पादचारी यांपैकी कोणीतरी ह्या ठिकाणी पडून अपघात झाल्यावरच मनपा टी विभाग  कार्यालय जागृत होऊन येथे ढाकणे बसवलं असे वाटते. तो पर्यंत वाट पाहण्यापेक्षा इतर पर्याय नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

वीणा नगर पुलावर टेम्पो चालकांची वारंवार घुसखोरी.

मुलुंड पश्चिम येथे मनपा पाईप्लाईन वरून वीणा नगर व स्वप्नगरी या विभागांना जोडणाऱ्या पुलावर नेहमीच अशी जबरदस्तीची घुसखोरी होत असते व त्यामुळे येथे  वाहतुकीची समस्या निर्माण होते. 

सदर पूल केवळ हलक्या वाहनांसाठी निर्मित करण्यात आला असताना देखील अनाधिकृपणे उंची वाढवलेले छोटे टेम्पो एक किलोमीटचे अंतर टाळण्यासाठी या पुलाचा वापर करतात. सदर समस्येवर मात करण्यासाठी मनपा द्वारा एक आठ फुटाचे बॅरीकेड स्वरूपी कमान उभारण्यात आली मात्र तरी देखील व्यावसायिक व अवजड वाहतूक करणारे टेम्पो या मार्गाने जबरदस्ती घुसखोरी करण्याचा प्रयत्न करून अशा पद्धतीने अडकतात. असे करणाऱ्या वाहनांसाठी मनपा व वाहतूक पोलिसांनी मिळून दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली पाहिजे असे स्थानिकांची मागणी आहे.







Tuesday, December 11, 2018

टी विभागाचा अजब गजब कारभार !


मुलुंड पश्चिम येथील मनपा टी विभाग  कार्यालयापासून जेमतेम शंभर मीटरच्या अंतरावर 100 असलेल्या बिलेश्वर महादेव मंदिरासमोरील पदपथाखाली असलेल्या गटाराचे ढाकण कित्येक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुटलेल्या ढाकणाबाबत मनपा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता तातडीचा उपाय म्हणून त्याच तुटलेल्या ढाकणावर अजून एक तूटलेल्या ढाकण टाकण्यात आले आहे.


एखादी घटना घडल्यानंतरच टी विभाग मनपा प्रशासनास जाग येणार आहे असे वाटतंय!


काय म्हणावे मनपाच्या या गंभीर थुकपट्टी कामाला..?





Sunday, October 28, 2018

STUDENTS CANT CONCENTRATE DURING EXAMS DUE TO HEAVY CONSTRUCTION ACTIVITY IN VANI VIDYALAY SCHOOL CLAIM PARENTS OF MULUND VIDYA MANDIR SCHOOL STUDENTS.


Mulund, Saturday 27 Oct 2018 
Students and their parents from Mulund vidya mandir school were angered at the adjoining Vani Vidyalaya school administration for carrying out heavy construction activity while the semester exams was on. Irate parents criticised the Vani vidyalaya school for its ignorant attitude as their wards complained of heavy construction  noises distracting them from examination which did not allow the students to concentrate.
Parents said they were surprised that even though vani vidyalaya was a school itself the administration was being ignorant of sufferings by neighbouring school students.
When the administration of vani vidyalaya was contacted they claimed that the construction of the school building has been going on since past one year and none had any issues with the activity. Further if the mulund vidya mandir school had intimated about their exam schedule they would have take appropriate measures in order to avoid inconvenience to their school children.

Popular Posts